कविता लिहिणे काही मला जमत नाही. खूप प्रयत्न करुनही कविता लिहिता येत नाही. शेवटी कविता लिहिता येत नाही त्यासाठीच कविता लिहिली.
काय ग राणी, किती ग त्रास देशील आणि
अग किती भटकलो मी दऱ्या खोऱ्यात
ग्रीष्माच्या चटक्यात आणि पावसाच्या तडाख्यात
सोसले बरं टाकीचे घाव
बांधले अश्रूंचे इमले
दिसली नाही तुझी पावले
अग किती लपशील आणि
अग ती बघ सुरवंटालाही पंख फुटली
वेलीवर सुद्धा फुले बहरली
आकाशातील गुरे पांगली
सूर्याची भ्रमणे देखील संपली
तरी सरता सरत नाही तुझी वेणी फणी
तू छळते कृष्णाच्या लिलेसारखी
तू बोचते गुलाबाच्या पाकळीसारखी
तू हसते परिकथेतल्या राक्षसासारखी
तू वाहते मात्र अश्वत्थामाच्या जखमेसारखी
अग तुझा खेळ होतो गं पण माझा जीव जातो आणि